शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

भाजप सरकारने काढलेले अडीच लाख कोटींचे कर्ज गेले कुठे ? शशिकांत शिंदे; वीज, आरोग्याच्या प्रश्नावरून अधिवेशनात सरकार धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:49 IST

सातारा : ‘सध्याच्या सरकारच्या काळात शासनाच्या अनेक विभागांत भ्रष्टाचार वाढला आहे. आम्ही पुरावे देऊनही मुख्यमंत्री भ्रष्टाचाºयांना क्लीनचिट देण्यात धन्यता मानत आहेत.

सातारा : ‘सध्याच्या सरकारच्या काळात शासनाच्या अनेक विभागांत भ्रष्टाचार वाढला आहे. आम्ही पुरावे देऊनही मुख्यमंत्री भ्रष्टाचाºयांना क्लीनचिट देण्यात धन्यता मानत आहेत. भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांत अडीच लाख कोटींचे कर्ज काढूनही कोणत्याच विभागात काहीच कामे झाली नाहीत. हे काढलेले कर्ज नक्की गेले कुठे?’ असा प्रश्न उपस्थित करत आमदार शशिकांत शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात सरकारला धारेवर धरले. गुजरातचा निकाल पाहता पुढच्यावेळी तुम्ही सत्तेत नसणार, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

नागपूर अधिवेशनात आमदार शशिकांत शिंदेंची तोफ चांगलीच धडाडली. आरोग्य, महावितरण आणि वैद्यकीय विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचार आणि अनागोंदीचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.देशातील प्रत्येक गाव व पाड्यातील घरामध्ये सौभाग्य अलंकार या नावाने पंतप्रधानांनी विद्युत पुरवठा योजनेची घोषणा केली आहे. मात्र, अद्यापही अनेक गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. राज्यात पुरेसा कोळसा उपलब्ध नाही, त्यामुळे वीजनिर्मिती प्रकल्पांना मोठा फटका बसत आहे. वीज नसल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. सरकार अडचणीत असलेल्या शेतकºयांवरच वीज तोडणीची कारवाई करत आहे. याबाबत वारंवार चर्चा केली, सभागृहात लक्षवेधी मांडली, आवाज उठवला तरी अद्याप सरकारने काहीच केलेले नाही. आता कोणत्या मार्गाने प्रश्न मांडावा, असा सवालही आमदार शिंदे यांनी थेट अध्यक्षांनाच विचारला.आदिवासी कल्याणकारी योजनेतून नाशिकमध्ये दुधाळ जनावरे पुरवठा खरेदी करून लाभार्थ्यांना पुरवठा झाला नसल्याचे चौकशी करून निष्पन्न झाले आहे. त्याबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. आजपर्यंत या कार्यालयातील अधिकारी व नाशिकचे अप्पर आयुक्त यांच्यावर कारवाई झाली नाही, असा प्रश्न आमदार शिंदे यांनी उपस्थित केला.शस्त्रक्रियेचा खर्च रुग्णालयात नमूद करावाआरोग्य विभागातही अनागोंदी सुरू आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी नाहीत, औषधे नाहीत. खासगी रुग्णालयात गरीब जातो तेव्हा त्याचा किती पैसा जातो, याला मर्यादा नाहीत. आॅपरेशनसाठी किती खर्च असावा, हे प्रत्येक रुग्णालयात नमूद करण्याचा सरकारने कायदा करावा, असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.